Uncategorized
कृषी पीक कर्ज विमा योजना
भारतात पीक विमा कंपन्या:
भारतीय कृषि विमा कंपनी मर्या. (एआयसीआय) द्वारा प्रवर्तित:
१ साधारण विमा कंपनी (जीआयसी)
२ कृषि व ग्रामीण विकासाकरिता राष्ट्रीय बॅंक (नाबार्ड)
इतर चार विमा उपकंपन्या आहेत:
१ नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि..
२ न्यू इंडिया अशुअरन्स कंपनी लि.
३ ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
४ युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
बीएएसआयएक्सच्या सहकार्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने पहिल्यांदा हवामान विम्याची तरतूद केली आहे. इफ्को टोकीयोने अलिकडेच हवामान विमा व्यवसायामध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रीय कृषि विमा योजना (पीक विमा)
राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) देशामध्ये रबी 1999-2000 पासून भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली होती. आमच्या राज्यामध्ये ही योजना कृषि विभाग, कृषि विमा कंपनी (कार्यान्वयन एजंसी) आणि आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाच्या गोवणूकी सोबत खरीप 2000 हंगामापासून सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये ही योजना जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंका, ग्रामीण बॅंका, वाणिज्यिक बॅंका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष सहयोगाने व गोवणूकीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
उद्दिष्टे:-
अवर्षण, चक्रीवादळ आणि कीटक व रोग इत्यादीचा आपात यामुळे पीक वाया गेले तर शेतक-यांकरिता एका वित्तीय आधाराच्या उपायाची तरतूद करणे.
पुढील हंगामाकरिता एका पीक अपयशानंतर एका शेतक-याची उधार पात्रता पूर्ववत करणे.
शेती मध्ये प्रगतिशील शेती करण्याचे उपयोजन, उच्च मूल्य निविष्टि व उच्चतम तंत्रशास्त्र अंगीकारण्याकरिता शेतक-यांना उत्तेजन देणे.
शेती उत्पन्नात स्थैर्य आणण्या करिता मदत करणे, मुख्यतः आपात वर्षांमध्ये.
पीक संरक्षण:-
खरीप 2008 दरम्याने, वीस पीके संरक्षित करण्यात येतील उदा. 1. भात, 2. जवार, 3. बाजरा, 4. मका, 5. काळा हरभरा, 6. हीरवा हरभरा, 7. लाल हरभरा, 8. सोयाबीन, 9. भुईमूग (आय), 10. भुईमूग (युआय), 11. सूर्यफूल, 12. एरंडेल, 13. ऊस (पी), 14. ऊस (आर), 15. कापूस (आय), 16. कापूस (युआय), 17. मिरची (आय), 18. मिरची (युआय), 19. केळी, 20. हळद.
रबी 2007-08 दरम्याने, अकरा पीके संरक्षित करण्यात आली होती उदा. 1. भात, 2. जवार (युआय), 3. मका, 4. हिरवा हरभरा, 5. काळा हरभरा, 6. भुईमूग, 7. सूर्यफूल, 8. मिरची, 9. कांदा, 10. आंबा, 11. बेंगाल हरभरा.
विम्याची रक्कम/संरक्षणाची मर्यादा :
विम्याची रक्कम (एसआय) विमा उतरलेल्या शेतक-यांच्या विकल्पावर विमा उतरलेल्या पीकाच्या सुरुवातीच्या उत्पन्नाच्या किंमती पर्यंत वाढविण्यात येईल. तथापि, एक शेतकरी वाणिज्यिक दरांवर विमा हप्त्याच्या भरण्यावर निश्चित केलेल्या क्षेत्राच्या सरासरी उत्पन्नाच्या 150% पर्यंत सुरुवातीच्या उत्पन्न स्तराच्या किंमतीच्या पुढे त्याच्या पीकाचा विमा उतरवू शकेल. ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये विम्याची रक्कम अग्रिम पीक कर्जाच्या रक्कमेच्या कमीत कमी समान असावी. अधिक, ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये, विमा प्रभार कर्ज प्राप्त करण्याच्या प्रयोजना करिता वित्त परिमाणाच्या अतिरिक्त असतील. पीक विमा संवितरण प्रक्रियांच्या प्रकरणां मध्ये आरबीआय / नाबार्डचे मार्गदर्शन बंधनकारक राहील.
विमा हप्त्याचे दर:
विमा हप्त्याचे दर बाजरा व गळित धान्यांकरिता 3.5%, इतर खरीप पिकां करिता 2.5%, गहू करिता 1.5% व इतर रबी पिकांकरिता 2% आहेत. जर विमागणितीय आधार सामग्रीच्या आधारावर तयार केलेले दर विहित दरापेक्षा कमी आहेत तर, निम्न दर लागू होईल. लहान व किरकोळ शेतक-याची व्याख्या खालील अनुसार राहीलः-
किरकोळ शेतकरी: 1 हेक्टर किंवा कमी (2.5 एकर) जमीन धारण करणारा एक शेतकरी.
ऋतुमानता अनुशासन:
१) ऋणको शेतक-यांकरिता पालन करण्यात येणारे विस्तृत ऋतुमानता अनुशासन खालील अनुसार राहीलः
कार्यक्रम – खरीप / रबी
कर्ज कालावधी – एप्रिल ते सप्टेंबर / ऑक्टोबर ते मार्च
घोषणा स्वीकृति करिता कट-ऑफ तारीख – नोव्हेंबर / मे
उत्पन्न आधार सामग्री स्वीकृतिकरिता कट-ऑफ तारीख – जानेवारी / मार्च जुलै / सप्टेंबर
२) बिगर-ऋणको शेतक-यांच्या संबंधा मध्ये प्रस्ताव स्वीकृति करिता विस्तृत कट-ऑफ तारखा खालील अनुसार राहतील :-
१ खरीप हंगामः 31 जुलै
२ रबी हंगामः 31 डिसेंबर
तथापि, ऋतुमानता अनुशासनात फेरबदल करण्यात येईल, जर आणि जेथे राज्य / केंद्रशासित प्रदेश व भारत सरकार सोबत विचारविनिमयामध्ये आवश्यक आहे.
संरक्षणाचे स्वरूप व क्षतिपूर्ति :-
राष्ट्रीय कृषि विमा योजना अंतर्गत भरपाई खालील सूत्रावर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आकारलेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारावर निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये निश्चित केलेल्या पिकांकरिता परिगणित करण्यात येईल.
आरंभ उत्पन्न – वास्तविक उत्पन्न
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – X विम्याची रक्कम
आरंभ उत्पन्न (कर्ज मंजूर रक्कम)
जेथे:
आरंभ उत्पन्न = हमी प्राप्त उत्पन्न
वास्तविक उत्पन्न = निश्चित केलेल्या पीकाचे वर्तमान उत्पन्न
विम्याची रक्कम = मंजूर कर्ज
जेव्हा जेव्हा उत्पन्न नुकसान आढळेल, भरपाई रक्कम भारतीय कृषि विमा कंपनी मर्यादित द्वारे परिगणित करण्यात येईल, व ती संबंधित बॅंकां द्वारे पात्र ऋणकोंच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. एका विशिष्ट विमा एककामध्ये, जर वास्तविक उत्पन्न आरंभ उत्पन्नापेक्षा (हमी प्राप्त) अधिक आहे, तर भरपाई शून्य राहील.
पीक विम्याकरिता अर्ज कसा करावा
प्रत्येक पीक हंगामाच्या सुरुवातीला, जीआयसी सोबत सल्लामसलत करुन राज्य सरकार /केंद्र शासित प्रदेश प्रशासन पीके अधिसूचित करेल व क्षेत्रे निश्चित करेल, जी हंगामा दरम्याने योजने अंतर्गत संरक्षित करण्यात येतील. विमा हप्त्या सोबत पीक विम्याचा मासिक पीक-अनुसार व क्षेत्र-अनुसार तपशील नोडल पॉइण्टला पाठवावा व विविध कर्ज संवितरण पॉइण्ट कडून अशा माहितीच्या प्राप्तिवर नोडल पॉइण्ट निश्चित कट-ऑफ तारखांनुसार मासिक आधारावर त्याची छाननी करेल व तो जीआयसीला पारेषित करेल. ऋणको शेतक-याने कर्जा सोबत, ज्याकरिता बॅंक त्याला खाली निर्दिष्ट रुपात घोषणा प्रपत्र भरायला व संबंधित दस्तऐवज प्रस्ताव प्रपत्राला संलग्न करायला भाग पाडेल, पीक विमा घ्यावा. बिगर-ऋणको शेतकरी, जो योजने मध्ये दाखल होण्याकरिता इच्छुक आहे, त्याने प्रस्ताव व एनएआयएसचे घोषणा प्रपत्र भरावे व ते वाणिज्यिक बॅंकेची ग्राम शाखा किंवा क्षेत्रीय ग्रामीण बॅंक किंवा सहकारी बॅंकेची पीएसीएस मध्ये विम्याच्या हप्त्या सोबत सादर करावे. प्रस्ताव स्वीकारताना विमा रक्कमेच्या तपशील, अधिकतम मर्यादा इत्यादीची पडताळणी करणे शाखा/पीएसीएसची जबाबदारी आहे. तपशील त्यानंतर एकत्रीकृत आहे व तो सरकारच्या अधिसूचने मध्ये विनिर्दिष्ट तारखांच्या पूर्वी जीआयसी राज्य स्तरीय पीक विमा विभागाला पुढील प्रेषणाकरिता संबंधित नोडल पॉइण्टना पाठवावा.
संलग्न करण्या करिता प्रपत्रेः
बिगर-ऋणको शेतक-या करिता प्रस्ताव प्रपत्र
ऋणको शेतक-याकरिता घोषणा प्रपत्र
बिगर-ऋणको शेतक-या करिता घोषणा प्रपत्र
कृषि विमा रक्कम / विमा हप्त्याची परिगणना :
विमा हप्त्याची रक्कम काही घटकांवर उदा. शेतक-याच्या जमीनीचा आकार, त्याची वित्तीय स्थिति, विमा उतरविण्यात आलेल्या पीकांची संख्या व विम्याच्या रक्कमेवर अवलंबून आहे. शेतकरी एक दावा प्रपत्र सादर करुन बॅंकांकडून दावा करु शकतील. दावा प्रतिनिधी पीकांना हानी पोचविणा-या कारणांच्या व्याप्तिचे विश्लेषण करतील. सर्वेक्षकाच्या अहवालावर आधारित, दावा एक महिन्याच्या आत शेतक-यांना देण्यात येईल.
कृषि विमा दाव्या करिता आवश्यक दस्तऐवज :
१ शेतक-याने पदनिर्देशित शाखा / पीएसीएस जवळ जाणे आवश्यक आहे व विहित स्वरुपामध्ये प्रस्ताव प्रपत्र सादर करावे.
२ शेतक-याने लागवडयोग्य जमीनीच्या कब्जाच्या संबंधामध्ये दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे (पास बुक व उता-याची प्रत).
३ जमीन महसूल पावती संलग्न करावी.
शेतक-याने, जर आवश्यक असेल तर, क्षेत्र पेरणी पुष्टीकरण प्रमाणपत्र पुरवणे आवश्यक आहे.
दावा मान्यता व समझोता करिता प्रक्रिया:
१. विहित कट-ऑफ तारखांनुसार राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारांकडून एकदा उत्पन्न आधार सामग्री प्राप्त झाली, तर दावे आयए द्वारे तयार करण्यात व समझोता करण्यात येतील.
२. दावा तपशीलांसोबत दावा धनादेश व्यक्तिगत नोडल बॅंकांना प्रदान करण्यात येतील. बॅंक सामान्य लोकांच्या स्तरावर, आळीपाळीने, व्यक्तिगत शेतक-यांच्या खात्यांमध्ये जमा करेल व त्याच्या सूचना फलकावर लाभाधिका-यांचा तपशील प्रदर्शित करील.
३. स्थानिक घटनेच्या उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादीच्या संदर्भामध्ये आयए, डीएसी/राज्य/केंद्रशासित प्रदेशांसोबत विचार विनिमय करुन व्यक्तिगत शेतकरी स्तरावर अशा हानिचा अंदाज करण्या करिता एक प्रक्रिया विकसित करेल. अशा दाव्यांचा समझोता आयए व विमेदार दरम्याने व्यक्तिगत आधारावर करण्यात येईल.
हवामान विमा योजनाः
हवामानाच्या लहरींमुळे होणा-या हानिकरिता विमा-अधिक पाऊस, पावसात तूट, सूर्यप्रकाशाची उणीव इ.
आरंभ करण्यात आलेल्या हवामान विमा योजना : वर्षा बीमा – २००५
व्याप्ति :
वर्षा बीमा तुटीच्या पावसामुळे पीक उत्पन्ना मध्ये अपेक्षित तुटीला संरक्षण देते. वर्षा बीमा शेतक-यांच्या सर्व प्रकारां करिता ऐच्छिक आहे. ज्यांना पावसाच्या अनिष्ट आपातामुळे वित्तीय रूपात नुकसान पोहचले आहे, ते योजने अंतर्गत विमा घेऊ शकतील. सुरुवातीपासून वर्षा बीमा शेतक-यांकरिता अर्थपूर्ण आहे, ज्यांच्या करिता राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) ऐच्छिक आहे.
विम्याचा कालावधी :
विमा लघु कालावधी पिकां करिता जून ते सप्टेंबर, मध्यम कालावधी पिकां करिता जून ते ऑक्टोबर व दीर्घ कालावधी पिकांकरिता जून ते नोव्हेंबर दरम्याने उपयोगात येतो. अधिक, हे कालावधी राज्य-विनिर्दिष्ट आहेत. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणामध्ये तो 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आहे.
वर्षा बीमा कसा खरेदी कराल :
प्रस्ताव प्रपत्रे सर्व कर्ज संवितरण केंद्रावर उदा. सर्व सहकारी / वाणिज्यिक / ग्रामीण बॅंकांच्या पीएसी शाखांवर उपलब्ध आहेत. सामान्य लोकांच्या स्तरावर वर्षा बीमा अंतर्गत संरक्षण एनएआयएस, विशेषतः सहकारी क्षेत्र संस्था, रूपात ग्रामीण वित्त संस्थांच्या (आरएफआय) वर्तमान जाळ्या मार्फत बहुधा देण्यात येईल. तसेच एआयसी त्याच्या जाळ्याच्या उपलब्धतेच्या अधीन प्रत्यक्ष बाजार / विम्याची तरतूद करेल. ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या संस्था औपचारिक व अनौपचारिक संस्था उदा. एनजीओ, स्वयं मदत समूह (एसएचजी), शेतक-यांच्या समूहांचे जाळे वर्षा बीमाच्या बटवड्याकरिता उपयोगात आणता येऊ शकेल. वर्षा बीमा अंतर्गत विम्या करिता प्रस्तावित शेतक-यां जवळ आरएफआय शाखेमध्ये एक बॅंक खाते असणे आवश्यक आहे, जी त्याचे/तिचे विमा व्यवहार सुकर करेल.
विमा खरेदी कालावधी :
एक शेतकरी इतर विकल्पांकरिता 30 जून व पेरणी अपयश विकल्पा करिता फक्त 15 जून पर्यंत वर्षा बीमा खरेदी करु शकेल.
संरक्षण विकल्पः
विकल्प – I: मोसमी पर्जन्यमान विमा :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमानाकडून (मिमी. मध्ये) वास्तविक पर्जन्यमाना मध्ये 20% व अधिकच्या नकारात्मक विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. वास्तविक पर्जन्यमान जून ते नोव्हेंबर पर्यंत मासिक संचयी पर्जन्यमान आहे (लघु व मध्यम कालावधी पिकांकरिता जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर सोबत). पैसे पूर्णपणे देण्याची संरचना ह्या प्रकारे बनविण्यात आली आहे की, उत्पन्न पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध श्रेणीशी परस्पर संबंद्ध आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणांवर (टप्प्यां मध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.
विकल्प – II: पर्जन्यमान वितरण निर्देशांक :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमान निर्देशांका कडून वास्तविक पर्जन्यमान निर्देशांकामध्ये 20% व अधिकच्या प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. निर्देशांक हंगामा मध्ये साप्ताहिक पर्जन्यमाना करिता परस्पर संबंध वाढविण्याकरिता निर्माण करण्यात आलेला आहे. निदेशांक आयएमडी स्टेशन ते स्टेशन व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होतील. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर (टप्प्यांमध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमान निर्देशांका मध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.
विकल्प – III: पेरणी अपयश :
15 जून व 15 ऑगस्ट दरम्याने 40% पुढे साधारण पर्जन्यमान (मिमी. मध्ये) कडून वास्तविक पर्जन्यमाना मध्ये (मिमी. मध्ये) प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम पेरणी कालावधीच्या समाप्ती पर्यंत शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निविष्ट खर्च आहे व ती पूर्व विनिर्दिष्ट आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर राहील, जे पर्जन्यमान विचलनांच्या विविध प्रमाणानुसार असेल. विम्याच्या रक्कमेच्या 100% अधिकतम पैसे पूर्णपणे देणे 80% व अधिकच्या विचलनांवर उपलब्ध आहे.
विम्याची रक्कम :
विम्याची रक्कम पूर्व-विनिर्दिष्ट आहे व साधारणपणे उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत दरम्याने आहे. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणा मध्ये, पेरणी कालावधी, जो पुन्हा पूर्व-विनिर्दिष्ट आहे, समाप्ती पर्यंत तो शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निर्विष्ट खर्च आहे.
विमा हप्ता :
विमा हप्ता विकल्प ते विकल्प व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होईल विमा हप्त्याचे दर लाभ लक्षात घेऊन आशावादी आहेत, व 1% पासून सुरु होतात.
दावा भरण्याचे वेळापत्रक व प्रक्रिया:
दावे तयार करण्याची प्रक्रिया स्वयंचलित आहे अर्थात विमेदार शेतक-या द्वारे दाव्यांची सूचना किंवा गहाळ माहिती सादर करण्या करिता आवश्यकता नसेल. साधारणपणे दावे क्षतिपूर्ति कालावधीच्या समाप्ती पासून एका महिन्या मध्ये वास्तविक पर्जन्यमान आधार सामग्रीच्या आधारावर चुकता करण्यात येणार आहेत.
पीक विमा योजनेची एकंदरीत गरज, व्याप्ती, अंमलबजावणीत असणारी क्लिष्टता अशा अनेक कारणांमुळे पीक विमा योजना सध्यातरी सार्वजनिक पातळीवरच आहे. वैयक्तिक पातळीवर विमा योजना राबवणे अवघड असले, तरी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरीप, रब्बी व बारमाही अशा पीक हंगामांतील सर्वच पिके अजूनही योजनेत समाविष्ट झालेली नाहीत, त्यामुळे उपलब्ध योजनेचाच लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींची दक्षता घ्यावी.
1) आपण करीत असलेल्या खरीप, रब्बी व बारमाही पिकांचा अंतर्भाव पीक विमा योजनेत आहे किंवा नाही याची प्रथम चौकशी करावी.
2) सदर पीक विमा योजनेसाठी पात्र असल्यास, त्वरित नजीकच्या बॅंकेत संपर्क साधून पीक कर्जाचा अर्ज देऊन कर्ज मंजूर करून घ्यावे व आपले पीक कर्ज विमा अंतर्गत समाविष्ट केल्याची खात्री करावी.
3) आपण पीक कर्ज घेत नसाल, तर बॅंकेत जाऊन योग्य ते फॉर्म भरून विमा हप्ता भरावा व योजनेत समाविष्ट केल्याची खात्री करावी.
4) विमा योजनेत समाविष्ट होण्यासाठी (कर्जदार किंवा बिगर कर्जदार) दिलेल्या मुदतीत सर्व बाबींची पूर्तता करावी, कारण ही मुदत निघून गेल्यावर योजनेत समाविष्ट होता येणार नाही.
5) विमा योजना सार्वजनिक पातळीवर ठरवलेल्या नुकसान भरपाईवर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानच विमा मंजुरीस पात्र असते. त्यामुळे ग्रामपंचायत, तालुका पंचायत अशा ठिकाणी चौकशी करावी. आणेवारी किती जाहीर होते, याकडे लक्ष ठेवावे.
6) आपण पीक कर्ज घेत असल्यास, ते त्वरित – वेळेवर भरून नवीन कर्ज वितरण विमा मुदतीतच करून घ्यावे, कारण या मुदतीनंतर घेतलेले कर्ज विमा करण्यास पात्र असणार नाही.
7) कर्ज वेळेवर भरले नाही, थकीत गेले, तर नवीन कर्ज मिळणार नाही. अशा परिस्थितीत जुने, थकीत कर्ज विम्यास पात्र राहणार नाही व नवीन कर्ज न मिळाल्यामुळे नवीन पीक विम्यास पात्र राहणार नाही. त्यामुळे पीक कर्ज वेळेवर भरावे. पीक कर्ज घेण्यात अडचण असेल, तर स्वतंत्रपणे विमा घ्यावा.
8) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक आले नाही व सदर पीक विमा मंजुरीस पात्र झाल्यास, अशा कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज घ्यावे व ते पीक विमा योजनेत समाविष्ट करावे. पुनर्गठन केलेल्या कर्जास तीन वार्षिक हप्ते मिळतील. त्यातील काही रक्कम विमा रकमेतून भरपाई होऊ शकेल. बाकी रक्कम स्वतःला भरावी लागेल. शक्य असल्यास असे कर्ज विम्याची वाट न पाहता भरावे म्हणजे व्याजाचा बोजा वाढणार नाही.
9) पीक विमासंदर्भात केल्या जाणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची कागदपत्रे, पोच जपून ठेवावी.
10) सध्याच्या विमा पद्धतीनुसार, वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळत नाही. तसेच, सरासरी उत्पादन घट व त्याप्रमाणे विमा मंजुरी होत असते, त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान व भरपाई यांत फरक राहतो. म्हणून आपली परिस्थिती साथ देत असेल, तर कर्ज लवकरात लवकर भरावे. विमा मंजूर होऊन आल्यानंतर सदर रक्कम रोखीने परत मिळू शकते.
शेतकऱ्यांच्या माण्या, शासकीय धोरणे यानुसार पीक विमाबाबत वरचेवर बदल होत असतात, त्याची माहिती घेत राहणे महत्त्वाचे असते.
वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स
वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स
वाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे.हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते.वाहन परवाना मध्ये
१.मोटार सायकल ५० सी सी
२.मोटार सायकल विना गिअर
३. मोटार सायकल विना गिअर सह
४.लाईट मोटार व्हेईकल
५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट
६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट
७.हेवी मोटार व्हेईकल असे प्रकार पडतात
- लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स
- कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक असते.
- ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.
- विना गिअर ५० सी सी च्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्णची आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते.तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.
- वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.
- अवजड वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वाहनचालक परवाना प्रकाराद्वारे वय पूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स सादर करावी लागते.त्याच प्रमाणे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो परवाना अर्ज करते वेळी जोडावे लागतात.
- निवासी / रहिवासी प्रमाणपत्र . व मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र.
या कागदपत्राण बरोबर निश्चित केलेले शुल्क जमा केल्यास कागदपत्रांची सत्यता तपासून वाहनचालक परवानासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक व नियमांची माहिती अशी परीक्षा दिल्यानंतर लर्नर्स/तात्पुरता वाहनचालक परवाना दिला जातो.जर व्यक्ती प्रात्यक्षिक मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येते.
तात्पुरता वाहनचालक परवाना प्राप्ती नंतर ३० ते १८० दिवसांच्या आत स्थायी वाहनचालक परवाना घ्यावा लागतो.त्यासाठी तात्पुरता वाहन परवाना व व्यक्ती ज्या वाहन परवान्यासाठी मागणी करते ते वाहन सोबत घेऊन परीक्षकांसमोर वाहन चालविणे नियमांची माहिती सांगणे या बाबी पूर्ण केल्यास स्थायी वाहन परवाना दिला जातो.ज्याची मुदत दीर्घ असते.
कोणतेही मोटार वाहन दुचाकी वाहनासह चालवताना खालील कागदपत्र मूळ स्वरुपात असण कायद्याने बंधनकारक आहे.
१.वाहन परवाना
२.वाहन नोंदणी प्रमाणपत्र
३.कर आकारणी प्रमाणपत्र
४.वाहन विमा प्रमाणपत्र
५.वाहन हे प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे प्रमाणपत्र
६.जर वाहन हे वाहतूक करणारे असले तर वाहतूक परवाना आणि वाहन योग्यता / फिटनेस प्रमाणपत्र.
लायसेन्स वैधता / मुदत
लर्निंग लायसेन्स — मुदत— ६ महिने
ट्रान्सपोर्ट लायसेन्स — मुदत — ३ वर्षे
केमिकल वाहन — मुदत — १ वर्षे
५० वर्षा नंतरचे लायसेन्स — मुदत — ५ वर्षे
इतर लायसेन्स वय ५० पर्यंतची — मुदत — २० वर्षे
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
-
विंधन विहिर सर्वेक्षणभूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र देणे
-
वाळू उत्खनन सर्वेक्षण
शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना
नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.
शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे.त्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल
- जागा स्वमालकीची असले तर जागेचा उतारा.
- जागा भाडेतत्वावर असल्यास १०० रु. स्टॅम्प वर मालकाचे समंती पत्र लाईट बिल टेलिफोन बिल नसल्यास समंती पत्रात जागेचे ठिकाणपूर्ण नोंदवावे.
- दोन फोटो,अर्जदाराचे कुपन झेरॉक्स
- पॅन कार्ड झेरॉक्स.
उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या शॉप अधिनियम लायसेन्स प्राप्तीसाठी मार्गदर्शक कर सल्लागार यांच्या मार्फत किंवा सक्षम आपण कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव योग्य चलन व फी जमा करून सादर करावा.प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान ९ दिवसात शॉप अधिनियम परवाना प्राप्त होतो.सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.शॉप अधिनियम परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.नूतनीकरण करते वेळी ओरिजनल परवाना जवळ असावा.शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो.हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.
माहितीचा अधिकार अधिनियमन २००५
माहितीचा अधिकार अधिनियमाने नागरिकांना विविध शासकीय कामांची,प्रक्रियेची,शासन ज्या ठिकाणी अनुदान किंवा आर्थिक / वस्तू स्वरुपात पुरवठा करते.अशा संस्थेतील माहिती प्राप्त करता येते.
माहिती अधिकार अन्वये माहिती प्राप्त करण्याची पद्धत
- माहिती अधिकार अधिनियम २००५ चा अर्ज.
- अर्जावर १० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प चिकटवा
- अर्जातील माहितीत नाव,पत्ता,संपर्क,माहितीचा विषय व कालावधी नमूद करून अर्ज माहिती अधिकारी यांच्याकड सादर करावा.व अर्जाच्या झेरॉक्स वर अर्ज सादर केला म्हणून कार्यालयाची पोहच घ्यावी.
- अर्जदाराने दिलेले माहिती हि सुटीचे दिवस वगळून ३० दिवसात द्यावी लागते.
- माहितीच्या प्रत्येक पानासाठी रुपये २ प्रमाणे शुल्क भरावे लागते.
- दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना माहिती मोफत देण्यात येते.त्यासाठी त्यांनी अर्जासोबत आपण दारिद्र्य रेषेखालील आहोत असा पुरावा जोडावा लागतो.
अपील करून माहिती प्राप्ती
१.जर व्यक्तीला अर्ज करूनही माहिती मिळत नसल्यास.२.व्यक्तीचा अर्ज फेटाळला असल्यास.३.चुकिची व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधित माहितीसाठी अपील करून माहिती प्राप्त करता येते. असे अपील ३० दिवसांच्या आत करता येईल.त्यासाठी
- अपिलासाठी अर्ज सादर करावा लागेल तो अर्ज संबंधी कार्यालयातील वरिष्ठ / अपिलीय अधिकारी यांचे नावाने असेल.
- अर्जावर २० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावावा.
- अर्जात अर्जदाराचा व माहिती अधिकारी यांचे नाव,पत्ता,व कोणती माहिती आपणास माहिती अधिकारी यांचे कडून मिळाली नाही याचा उल्लेख करावा.
- स्वाक्षरी करून अर्ज जमा केल्याची पोहच घ्यावी
- अपिलीय अधिकारी यांचे कडून ४५ दिवसांच्या आत माहिती संबंधी उत्तर मिळते.
माहिती न देण्यासाठी अपवाद
- राष्ट्रीय सुरक्षा,हितसंबंध,राष्ट्रिय एकात्मता,इ.बाधक होईल अशी माहिती.
- खाजगी किंवा वैयक्तिक जीवनाशी निगडीत माहिती.
- २० वर्षांच्या आतील नायालयीन माहिती,सरकारी अनुदान न घेणाऱ्या संस्था इ.
सात बारा विषयी
जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी केलेली असते. त्यातील 7 नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर 12 नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण 7/12 मध्ये केलेले असते.
7/12 संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी:
1) 7/12 हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.
2 7/12 बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
3 7/12 ची नविन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात.
4 7/12 तील मालकी व इतर हक्का च्या ठिका नी कोण तेही महत्वाचे लिखान हे फेरफार नोंद के ल्या शिवाय ये वू शतेकत नाही. गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही.
5 प्रतेक वेळी 7/12 काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.
6 प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.
7 7/12 पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .
8 7/12 त मालकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार तलाठी यां ना नाही.
9 7/12 वरुण जमिनी च्या मालकी हक्का बाबत माहिती मिलते.
10 पूर्वी जेव्हा 7/12 नसत तेव्हा शेतवार पत्रक व सूडपत्रका वर नोंद लिहत.
फेरफार / गावनमुना 6 मधील नोंद
गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही यावर घेतले ल्या नों दी च 7/12 वर येतात. त्यामुळे शेतकर्याच्या दृष्टिने फेरफार उता रयाला अनन्य साधारण महत्व आहे. यातिल तपशील हा चार भागात लिहिला जातो. यात १ ) फेरफार नोंदणीचा अनुक्रमांक 2) हक्क प्राप्त व्यक्तिच्या अधिकाराचे स्वरुप, व्यवहाराचे स्वरुप दिनांक, संबंधित खातेदारांची नावे, मोबदला रकम आदी. बाबीचा उल्लेख असतो. 3) जमीन ज्य़ा गटात अथवा सर्वे नम्बर मधील आहे त्याचा नम्बर लिहिला जातो. 4) शेवटी फेरफार बरोबर आहे असे प्रामाणित करनारा अधिकारी / मंडल अधिकारी यांचे पदनाम व स्वाक्षरी असते.
फेरफार नोंद व प्रामाणित नोंद
शेत जमीन अथवा जमीन व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते.अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रीतसर नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कश्या पद्धतीने आली आहे हे दर्शवणारे पुरावे सादर करावे लागतात त्या कागदपत्रांच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते.व ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरु होते.
१.कोणत्याही कागदपत्राद्वारे जमिनीचा हक्क प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी सर्व संबंधिताना नोटीस देणे आवश्यक असते. नोटीस दिल्याशिवाय फेरफार मधील नोंद प्रमाणित करण्याची प्रक्रीयापूर्ण होत नाही. २.खरेदी करणार व घेणार हे वेगवेगळ्या गावाचे असतील तर त्याचे नाव पत्ते तलाठी यांना कळविणे गरजेचे असते.त्याच प्रमाणे वारसाच्या नोंदीसाठी सर्व वारसांचे नाव पत्ते व वारसांचे मयत खातेदारांशी नाते कळविले पाहिजे. ३.फेरफार नोंद लिहिल्यानंतर ती प्रमाणित होणे करिता नोटीस काढल्यानंतर किमान १५ दिवसाचा कालावधी जाऊ देणे गरजेचा असतो.या नंतर नोंद प्रमाणित करता येते .व त्यानंतर दुरुस्तीचा ७/१२ मिळतो.
फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
१.फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते. २.काही कारणाने जर सूची २ मध्ये चूक झाली असल्यास ते खरेदीखत सादर करून सब रजिस्टर यांच्या कार्यालयातून दुरुस्ती करता येते. ३.सातबारा वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो. ४.कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत ती खरी मानण्यात येते. ५. जमिनीच्या अधिकारात जसजसा बदल होतो. म्हणजेच जमिनीचे मालक जसे बदलतात त्या क्रमवारीने त्याच्या नोंदी फेरफार मध्ये नमूद केलेल्या असतात. ६. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनीबाबत माहिती मिळते
जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना
१.मागासवर्गीय शेतकर्यांना ऑइल इंजिन व इलेक्ट्रिक मोटार पुरविणे-
पात्रता ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असणे बंधनकारक आहे.उमेदवार हा मागासवर्गीय प्रवर्गातील आहे असा दाखला.
२.मागासवर्गीय विद्यार्थांना संगणक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे –
लाभार्थी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा तसे कागदपत्रे जोडावी त्याच प्रमाणे प्रशिक्षणासाठी फी रु.२५००/- मर्यादित असेल.संगणक कोर्स हा शासनाने मान्यता प्राप्त केलेला असतो.लिपिक पदासाठी लागणारी किमान अर्हता देण्यावर भर असतो.
३.मागासवर्गीय आपत्ती ग्रस्तांना अनुदान देणे-
लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत केली जाईल.नैसगिक आपत्ती बाबत मा.तहसीलदारयांचा नुकसानीचा पंचनामा आवश्यक असेल.तसेच हृदय विकार,कर्करोग,क्षयरोग इ.असाध्य रोग असल्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तसा दिलेला दाखला सादर करणे आवश्यक राहील.या योजनेत लाभार्थ्यांना ५०००/- अर्थ सहाय्य देण्यात येते.
४.मागासवर्गीयांना घरगुती पीठ गिरणी पुरविणे-
लाभार्थी व्यक्तीस जागेचा ७/१२ व ८ अ चा उतारा आवश्यक राहील.जागा स्वताच्या मालकीची असावी तसे नसल्यास भाडेतत्वाने घेतलेली जागा चालते.त्यासाठी भाडेकरार नामा सादर करावा.त्याच प्रमाणे ग्रामपंचायत ८क जोडावा.विजेची सोय असल्याबाबतचा पुरावा जोडावा.या योजनेतून अदा करण्यात आलेल्या वस्तूची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णत लाभार्थ्यावर राहील.
५. मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थांना शिष्यवृत्ती देणे-
लाभार्थी इयत्ता ५ वी ते १० वी वर्गातील असावा.सदर विद्यार्थ्याने मागील परीक्षेला ६० टक्के गुण प्राप्त केलेले असावे.
६.मागासवर्गीयांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देणे-
शौचालय बांधण्यासाठी ७ हजार रु.अनुदान रोख स्वरुपात देण्यात येते. सुरुवातीला ५० टक्के व बांधकाम मुल्यांकन दाखला सादर केल्यानंतर ५० टक्के रक्कम देण्यात येते.असे बांधकाम करताना ग्रामपंचायत मार्फत व्हावे यासाठी घराचा ८ अ चा उतारा देणे आवश्यक राहील.मोकळ्या जागेबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला जोडावा.खर्चाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायत यांच्याकडून घेण्यात यावे.
७.आंतर जातीय विवाहित दाम्पत्यांना अर्थसहाय्य-
अस्पृश्यता निवारणाचा भाग म्हणून आंतरजातीय विवाह जोडप्यास अर्थसहाय्य देण्यात येते.यातील नवीन धोरणानुसार रु.५००००/-धनाकर्ष/राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व संसारपयोगी साहित्य या स्वरुपात दिले जाते.
१.या योजनेचा लाभ एकदाच देण्यात येतो.
२.विवाह नोंदणीचा दाखला आवश्यक आहे.
३.वधू वरांचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
४.या योजनेनुसार वर किंवा वधू पैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती जमाती व एक सुवर्ण हिंदू ,जैन,लिंगायत,बौध्द,शीख असा विवाह होणे आवश्यक आहे.या योजनांचा अधिक लाभ घेण्यासाठी किंवा माहिती मिळविण्यासाठी आपल्या पंचायत समितीत महिन्यातून एक व दोन वेळेस भेट द्यावी.काही योजनांसाठी प्रत्यक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी जि.प.कार्यालयास तीन सहा महिन्यातून एकदातरी भेट द्यावी व योजनेचा लाभ घ्यावा.
पेन्शन योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही अपघात विमा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण गरजेचे आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्यांच्या सहयोगाने ही योजना राबविण्यात येणार आहे. 18 ते 70 वयोगटातील बँकेतील बचतखातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एका व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्यामधून हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाणार आहे. या योजनेचा कालावधी 1 जून ते 31 मे असा आहे. योजनेच्या नूतनीकरणाचा अर्ज 31 मे पर्यंत द्यावा लागणार आहे. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला 3 महिने पर्यंत (30.11.2015) वाढवू शकते.
अपघात विमा भरपाई : मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे, एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी विमा हप्ता 12 रूपये प्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहिल. बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. विमा धारकाने वय वर्षे 70 पूर्ण केल्यावर, बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी अटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा चालू करता येईल.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे. 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.
या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही आयुर्विमा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजना चालविण्यात येणार आहे. 18 ते 50 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा काढता येणार आहे. विमा काढणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानण्यात येणार आहे.
योजनेचा कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे राहणार आहे. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाणार आहे. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज 31 मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला 3 महिने पर्यंत (30.11.2015) वाढवू शकेल.
विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रूपये भरपाई मिळणार आहे. या योजनेचा विमा हप्ता 330 रूपये प्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहणार आहे. विमा धारकाने वय 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे. काही अटींची पूर्तता केल्यानंतर विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येणार आहे.