अखंड भारत
"अंधेरे मे एक प्रकाश
जय प्रकाश "
ही घोषणा अखंड भारत भर ज्यावेळी चर्चिली जात होती त्या काल खंडाचे आम्ही साक्षीदार आहोत
जमीन विषयक अभ्यास व संशोधन करीत असताना गाव नमुना 1(क) 11 भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमीनी या संदर्भात प्रत्येक तलाठी सजा अंतर्गत माहिती घेत असतो (सोबत संदर्भीय शासन निर्णय)
त्या वेळेस JP व विनोबा भावे या महनीय व्यक्तींची सतत आठवण येत रहाते
किंबहुना या दोन व्यक्तींचा माझे वैयक्तिक आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे
कित्येक वर्षा पूर्वी पवनार आश्रमात स्वर्गीय विनोबा भावे यांना त्यांचे एका शिष्य असलेल्या युवतीने सांगितलेली कैफियत (ज्यात तिच्या वडिलांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या बाबतचे कथन होते)
आणि त्या नंतर शासना द्वारे झालेली CID चौकशी
ही अख्या महाराष्ट्र राज्यात चर्चिली गेली होती
व्यक्ती त्यांच्या निस्वार्थी कार्यामुळे अजरामर होतात हे या दोन व्यक्तींच्या कार्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होते
भारतरत्न व लोकनायक श्री जयप्रकाश नारायण तसेच विनोबा भावे यांनी लक्षावधी युवकांना त्या काळात प्रभावित केले होते