हक्क नोंदणी
अधिकृत नोंद. अशा नोंदींची वही अधिकृतपणे ठेवण्यात येते. व्यवहारात अगर सार्वजनिक क्षेत्रात लेखी आधार अगर पुरावा म्हणून अशी नोंदवही साधारणपणे ग्राह्य समजली जाते.
हक्क नोंद हि प्रत्याकाच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे कारण यावर अनेख बाबी अवलंबून असतात. हक्क नोंद नाही केल्यास पुढे येणाऱ्या समस्या मध्ये खूप त्रास होऊ शकतो. आजही ज्यास्तकरून न्यायालयीन प्रकरणे हि हक्क व त्याच्या नोंद न होणे किंवा चुकीच्या नोंदी होणे हक्क डावलणे इ. संदर्भात आहेत. प्रथम १९०४ ते १९०६ च्या दरम्यान हक्क नोंदणी पत्रके तयार करण्यात आली. या नोंदीमधील मजकुराचे महत्व मोठे आहे . नोंदणी कायद्यानुसार सर्वच कागदपत्रे नोंदणीकृत करणे गरजेचे नाही.
काही कागदपत्रे अशी आहेत ज्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे ती पुढीलप्रमाणे : –
१. भेट स्वरूपात दिलेली स्थायी मालमत्ता.
२. भाडेतत्वावर दिलेली अस्थायी मालमत्ता (एक वर्षपेक्षा अधिक काळासाठी).
३. मालमत्तेचे हस्तांतरन होत असेल किंवा नवीन हक्काची निर्मिती होत असेल तर (मालमत्ता १०० रु. पेक्षा जास्त).
४. कोणतेही कागदपत्र ज्यायोगे कोर्टाचा एखादा निर्णय रु. १०० पेक्षा अधिक मालमता हस्तांतरित होते जिल्ह्याच्या नोंदणी कागदपत्र , करार बनवल्यापासून चार महिन्यांच्या आत करणे बंधनकारक आहे .
उदा. जन्म-मृत्यू , नोंदणी कारखाने नोंदणी , आयकरासाठी उत्पन्न नोंदणी वाहन नोंदणी , जमा-खर्च नोंदणी , परदेशीय व्यक्ती नोंदणी , वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी , परवाना व एकस्व नोंदणी , संस्था नोंदणी , पुस्तक प्रसिद्धी नोंदणी , वर्तमानपत्र व नियतकालिके नोंदणी , धर्मार्थ संस्था नोंदणी , आकाशवाणी व दूरध्वनियंत्र नोंदणी , खानावळ व पानगृह नोंदणी , गुन्हा नोंदणी , दावे नोंदणी , विवाह नोंदणी , परदेशगमन परवाना नोंदणी इत्यादी.
