अतिक्रमणाचे प्रकार व वापर
शहरात मोठ्या दुकानांच्या समोर लागलेली छोटी दुकाने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण करणारी आहेत. जर माझे दुकान असते आणि त्याच्या समोर येण्या-जाण्याच्या मार्गात कोणी स्टॉल, किंवा फेरीवालीची गाडी रोज लागणार असल्यास मी काय केले असते? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारल्यास किमान समस्या सुटणार नाही परंतु इतरांना आपल्यामुळे होणार त्रास कसा असेल याची जाणीव तरी होईल. प्रचंड लोकसंख्या आणि वर्दळीच्या बाजूने होणारे ग्राहक यातून सर्वांना अतिक्रमण विरहित जागा मिळणे शक्य नाही. हे देखील आपण समजू शकतो. पेठ सोडून जागा कितीही सुटसुटीत व सोयीने युक्त असली तरी तेथे ग्राहक येत नाही. म्हणून आजही कित्येक शहरात किंवा गावातील आड बाजूचे शॉपिंग कॉम्प्लेक्स केवळ गोडाउन म्हणून वापरात आणली जातात.
अतिक्रमणाचे प्रकार व वापर :-
आज बहुतांशी जमिनी विषयीचे वाद हे वाटप व अतिक्रमण या बाबतच असल्याचे दिसून येतात. अगदी दोन देशांच्या सीमा वरून ते गावातील किंवा शहरातील दोन प्लॉट मधील अतिक्रमण इतक्या व्यापक प्रमाणात अतिक्रमण हा विषय व्यापला आहे.
अतिक्रमणाबाबत खालील तीन प्रामुख्याने दिसून येतो :-
१. शेतीसाठी केलेले अतिक्रमण
२. निवासी प्रयोजनासाठी / राहण्यासाठी केलेले अतिक्रमण
३. व्यापारी / छोटे व्यवसाहिक यांचे होणारे अतिक्रमण
वरील तिन्ही प्रकारांमध्ये अतिक्रमण करणारा व्यक्ती हा अतिक्रमणाचा खालील भूभाग वापरतो.
* सरकारी जागा :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम २० च्या पोट-कलम (१) अन्वये असे घोषित करण्यात आले आहे की, सर्व सार्वजनिक मार्ग, गल्ल्या व उपवने, पूल, खंदक, भित्ती व त्यांवरील किंवा त्यांच्या बाजूने घातलेली कुंपणे, समुद्राचे पात्र व सर्व बंदरे व उच्च जलपातळी चिन्हाखालील खाड्या, ओढे, नाले, तलाव व तळी, सर्व कालवे व जलमार्ग आणि स्थिर किंवा वाहते पाणी व दुस-याची मालमत्ता नसतील अशा कोणत्याही ठिकाणी असलेल्या जमिनी ही राज्य शासनाची मालमत्ता राहील. या पोटकलमामध्ये पुढे, आयुक्ताच्या आदेशांच्या अधीन राहून, विहित करण्यात येईल अशा पद्धतीने जमिनी इत्यादींची विल्हेवाट करण्याची शक्ती जिल्हाधिका-याला प्रदान करण्यात आली आहे.
* ग्रामपंचायत नगरपरिषद / नगरपालिका व महानगरपालिका यांच्या जागेवरील अतिक्रमण :-
जिह्यातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी गावागावामध्ये स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे अनेक गावामध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून मोठे वाद सुरु आहेत. जिह्यातील बहुतांशी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असून महसूल विभागास याबाबत माहिती असून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गायरान व मुलकीपड सारख्या शासकीय जमिनी केवळ कागदोपत्रीच शिल्लक असून प्रत्यक्षात बहुतांशी जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत.
१. रस्त्यांच्याकडेच्या जागेवरील अतिक्रमणे
२. खाजगी जागेवरील / वयक्तिक मालकी हक्काच्या जागेवर होणारे अतिक्रमण.
* निवासी प्रयोजनासाठी / राहण्यासाठी केलेले अतिक्रमण :-
निवासी जागेसाठी होणारी अतिक्रमणाच्या बाबत हि संख्या ग्रामीण भागाच्या मानाने शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळून येते. शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर, शहरातील अपुऱ्या जागा वाढती लोकसंख्या ग्रामीण भागातून किंवा परप्रांतातून येणारे लोक अशा मुख्य स्रोतांकडून जास्त प्रमाणात हे अतिक्रमण होत आहे.
महानगरपालिका यांच्या हद्दीतील व ताब्यातील जमिनीवर होताना दिसून येते. त्याच प्रमाणे हि अतिक्रमणे :-
१. शहरातील नदी मोठे नाले यांच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत.
२. शहरातील फ्री स्पेस साठी ठेवलेल्या राखीव भूखंडावर
३. नदी, तळे, याच्या काठी
४. शहराचा कचराडेपोच्या जवळपास
५. रेल्वे लाईन लगत
६. विविध महामंडळे, शासकीय मोठ्या परंतु दुर्लक्षित असलेल्या संस्था यांच्या कंपाऊंड नसलेल्या जागांवर
आदी ठिकाणे होताना दिसतात. एकाने पाल बांधले नंतर दुसरा आला. असे करता करता मोठी झोपडपट्टी तयार झाली असाच प्रवास प्रामुख्याने या जागांचा झाला आहे.
* व्यापारी व व्यवसायासाठी केलेले अतिक्रमणे :-
आज शहरातील सर्वात मोठी समस्या हि लहान व्यावसायिकांनी केलेले रस्त्यालगतचे फिरती दुकानाच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण होय. अशा अतिक्रमणातून फार मोठ्या जनसंख्येला रोजगार मिळत असला तरी ज्या ठिकाणी हे अतिक्रमण झाले आहे. तेथे चोरी ,रोजचे भांडणे, महिलांच्या तक्रारी, वाहतूक कोंडी, स्वच्छता आदी प्रश्नही उभे आहेत.
* खाजगी / वैयक्तिक मालकीच्या जागेवर केलेले अतिक्रमणे :-
आज शहरी असो अथवा ग्रामीण या दोन्ही भागातील व्यक्ती सर्वात जास्त अतिक्रमण या समस्येने त्रस्त आहे. आज अतिक्रमण हि समस्या कितीही सोडविण्याचा प्रयत्न केला तरी ती सुटताना दिसत नाही. खाजगी जागांच्या बाबत मुख्यतो बांध सरकणे, प्लॉटवर काही क्षेत्रावर अतिक्रमणकरणे. जागेचे मालक जवळ नसल्याने शेजारील प्लॉट धारक त्याचे बाथरूम जिना, ओटा, कंपाऊंड अशा बाबी इतर प्लॉटमध्ये बंधने त्याच प्रमाणे मालक शहरात राहतात त्यामुळे सदर जागा पडिकच तर आहे म्हणून तेथे निवासी किंवा शेती किंवा व्यवसायाचा दृष्टीने हिवरे अतिक्रमण या प्रकारात जास्त आहे.
